Monday, August 26, 2013

This is a story I received on email. Read my comment also at the end of it. 
 
Airline Lunch
I put my carry-on in the luggage compartment and sat down in my assigned seat. It was going to be a long flight from Gatwick. I'm glad I have a good book to read Perhaps I will get a short sleep,' I thought.
 
Just before take-off, a line of British Army Youngsters came down the aisle and filled all the vacant seats, totally surrounding me. I decided to start a conversation. 'Where are you blokes headed?' I asked the young man seated nearest to me. 'Cyprus. We'll be there for two weeks for special training, and then we're being deployed to Afghanistan.
 
 .... After flying for about an hour, an announcement was made that
lunches were available for five pounds. It would be several hours before we reached Cyprus, and I quickly decided a lunch would help pass the time. As I reached for my wallet, I overheard a soldier ask his mate if he planned to buy lunch. 'No, that seems like a lot of money for just an airline lunch. Probably wouldn't be worth five Quid. I'll wait till we get to Cyprus'. His mate agreed.
 
I looked around at the other soldiers. None were buying lunch. I walked to the back of the plane and handed the flight attendant a fifty Pound note. 'Take a lunch to all those soldiers..' She grabbed my arms and squeezed tightly. Her eyes wet with tears, she thanked me. 'My young bloke was a soldier in Iraq, it's almost like you are doing it for him..'

Picking up ten lunchboxes, she headed up the aisle to where the boys were seated. She stopped at my seat and asked, 'Which do you like best - beef or chicken?'
 
'Chicken,' I replied, wondering why she asked..
 
She turned and went to the front of plane, returning a minute later with a dinner plate from first class. This is your thanks.
 
After we finished eating, I went again to the back of the plane, heading for the rest room. An old bloke stopped me. 'I saw what you did. I want to be part of it. Here, take this.' He handed me twenty-five Pounds.
Soon after I returned to my seat, I saw the Captain coming down the aisle, looking at the aisle numbers as he walked, I hoped he wasn't looking for me, but noticed he was looking at the numbers only on my side of the plane. When he got to my row he stopped, smiled, held out his hand, and said, 'I want to shake your hand.'
 
Quickly unfastening my seat-belt I stood and took the Captain's hand. With a booming voice he said, 'I was an army pilot a long time back. Once someone bought me lunch. It was an act of kindness I never forgot.' I was embarrassed when applause was heard from all of the passengers.
 
Later I walked to the front of the plane so I could stretch my legs. A kid who looked about 18 was sitting about six rows in front of me reached out his hand, wanting to shake mine. He left another twenty-five Pounds In my palm.
 
When we landed I gathered my belongings and started to depart. Waiting just inside the aeroplane door was a man who stopped me, put something in my shirt pocket, turned, and walked away without saying a word. Another twenty-five Pounds!
 
Upon entering the terminal, I saw the soldiers gathering for their Trip up to their training area.. I walked over to them and handed them seventy-five Pounds. 'It will take you some time to reach your training area. It will be about time for a sandwich. God Bless You Blokes.'
 
Ten young blokes left that flight feeling the love and respect of their fellow Brits. As I walked briskly to my car, I whispered a prayer for their safe return. These soldiers were giving their all for our country. I could only give them a couple of meals. It seemed so little... 
 
A British/Indian Serviceman is someone who, at one point in his life, wrote a blank cheque made payable to
 'My Country'for an amount of 'up to and including my life.'  That is Honour, and there are way too many foreigners in this country who don't understand it
 
And here in INDIA , the Politicians not only robbing our Citizens with Millions and Billions of Dollars but are also robbing the DEAD Soldiers who Died for the Country and Countrymen, “The ADARSH” SCANDAL, is just one of the known incidents. Get up with your Mighty strength and DRIVE away the SCOUNDRELS with the voting power, do not forget to Educate the Poor and Illiterate who are victim to Bribe, else one day AMERICA and WEST will repeat IRAQ & LIBYA to our Country


May you have the strength and courage to pass this along to everyone on your email list....
 
I JUST DID!
--------------------------------------------------------------------------------------------

In India, we have abundant population. So by a simple rule of economy, if the supply is more, the value goes down. Human value is thus is very low in India. That's the reason why a Bihar politician said publicly that soldiers are paid to die for country, why so fuss? 

Price is a signal to manufacturers to produce more or less. 

But for soldiers, it is certainly de-motivation. If they run away from battles to save their own lives, who will defend us? 
 

Friday, March 29, 2013

माता न तू वैरिणी !

वर लिहिले आहे कि मजे मजेने वाचा .... पण हे लिखाण मात्र जरा गंभीरच आहे... मजा येईल...कदाचित राग येईल...पण वाचनीय जरूर आहे!


माता न तू वैरिणी ||
{आजच्या काळातील दुष्ट माता}

प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई||  
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी”||
आई हा शब्दच जादूचा आहे. उदात्तते तुझे दुसरे नावच आई, इतकी आई या नावाची महती आहे. आणि तरी गदिमांनी गीत-रामायणात भरताच्या तोंडी आईला वैरिणी म्हणायचे धाडस केले आहे. खरं म्हणजे कैकयीने जे काही केले ते भरताच्या भल्यासाठीच ! पण तरीही तोच पुत्र तिला अशी दुषणे देत असल्याचे तिला ऐकावे लागले.

पण आजही या आपल्या समाजात अशी अनेक उदाहरणे आहेत कि जी ऐकली कि खरंच प्रश्न पडतो कि हि माता आहे कि वैरीण ! या सर्व स्त्रिया काही खलनायिका नाहीत. पण या सर्व सत्य कहाण्या ऐकल्या कि मन सुन्न होतं.

माझ्या जवळच्या नात्यामध्ये एक स्त्री होती, तिला सत्ता गाजवायची भयंकर भूक होती. नवरा आणि मुलांवर तिने सतत अन्याय केला. तिचा एक मुलगा जरा वेगळा होता. त्याला अगदी लहानपणापासून नेहमी प्रश्न पडायचे.  “...तर काय होईल?” हे त्याचे पालुपद असायचे. तसं सगळ्याच मुलांना कुतूहल असतेच. पण याचे डोके नेहमी जरा तिरकेच चालायचे. “जेवलो नाही तर काय होईल? देवपूजा नाही केली तर काय होईल? शाळेत नाही गेलो तर काय होईल” असे त्याचे विचित्र प्रश्न ऐकून मजा वाटेल, पण राग येईल का? ते सुद्धा आईला? पण या आईला इतका राग यायचा कि ती फटाफट त्या ६-७ वर्षाच्या मुलाला कानफटात मारायची.

पण त्या मुलामधली जिज्ञासा काही कमी झाली नाही. उलट त्याला चेव येऊ लागला. मग काय, त्या आईचा त्या मुलावरचा राग वाढतच गेला, इतका कि मग त्याला चटके देणे, कोळशाचा चिमटा फेकून मारणे, उपाशी ठेवणे अशा शिक्षा सुरु झाल्या. तो मुलगा वेगळा आहे, त्याच्या कुतुहलामध्ये एक सर्जनशील संशोधक किंवा कलावंत लपला आहे हे काही केल्या त्या बाईला उमगले नाही. तिला तो एक उर्मट, उद्धट, बेशिस्त आणि उलट उत्तर देणारा वाह्यात मुलगाच दिसत होता. एकदा तर त्या बाईने (म्हणजे त्या मुलाच्या आईने) तर त्या मुलाला घरात जेवण्याची बंदीच घातली. कारण काय तर असेच काही तरी..! कि माझं ऐकत नाही! मला उलट उत्तर देतो वगैरे. पण शिक्षा मात्र भयंकर. आठवीतला तो पोर कुठे जेवील? आणि किती दिवस उपाशी राहील?

   दोन तीन दिवस उपाशी राहिल्यावर त्या बिचाऱ्याने शेवटी आपल्या हाताने स्वैपाक करायला सुरुवात केली. दुपारच्या सुट्टीत आई घरात नसतांना गुपचूप स्वैपाक करून तो तसाच म्हणजे कच्चा, बेचव वगैरे जेऊन घाईघाईत शाळेत जाउ लागला. आणि तसं तब्बल ३-४ आठवडे करीत राहिला. त्याचे वडीलही थोरच. थेट १५ दिवसांनी त्यांना हा असा पत्ता लागला. त्यांनी काय करावं? काही नाही. त्यांना त्या मुलाची कींवही आली नाही. तो मुलगाही भारीच. अशक्तपणा येऊ लागला तरी काही हरला नाही. शेवटी त्या बाईनेच माघार घेऊन त्याला जेवण्याचा “हुकुम” दिला.  

अर्थात या “बंडा”ची शिक्षाही त्या मुलाला अनेक वेळा मिळाली. त्याच्या इतर भावांना नवीन कपडे जेव्हा मिळत होते तेव्हा या मुलाला त्यांचे जुने कपडे मिळायचे. पुढे ते पण बंद झालं. अंगावरचे कपडे अगदी पार फाटले तेव्हा त्या मुलातला बंडखोर पुन्हा जागा झाला. त्याने मॅट्रीकच्या परीक्षेतले सर्व पेपर कोरे दिले. शाळेतून अर्थातच घरी लगेच कळाले. त्या मुलाच्या वडिलांना जेव्हा त्याचे कारण कळाले तेव्हा मग त्यांच्या लक्षात काहीतरी आले. कारण पुढचे काही दिवस जरा चांगले लक्ष दिले गेले.
पण थोड्याच दिवसांनी परत ये रे माझ्या मागल्या सुरु झालं. सोळा-सतरा वर्षाचा हा मुलगा घरातून पळून गेला. आणि पंधराएक दिवसांनी खिशातले पैसे संपल्याने मुकाट्याने घरात परत आला. पण त्याचा आनंद न त्याच्या आईला झाला, ना त्याच्या भावांना. त्याच्या आईची तर आली एक कटकट घरात अशीच प्रतिक्रिया झाली.
तो मुलगा हे सगळं कसं विसरू शकेल? त्या आई वडिलांच्या दुर्दैवाने त्यांच्या वृद्धापकाळात त्याच मुलाकडे आश्रय घ्यावा लागला, कारण त्यांच्या दृष्टीने त्यांच्या चांगल्या व सरळ अशा त्यांच्या इतर मुलांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली होती. कशी दैव गती आहे. आईच्या मायेऐवजी शिक्षेचे असे चटके बसल्यावर त्या मुलाच्या मनावर काय काय परिणाम झाले असतील, याची कुणाला काय फिकीर.  आपल्या मुलाच्या आयुष्याचे असे मातेरे करणारी ही माता कि वैरिण, ते तुम्हीच ठरवा.

दुसरे एक उदाहरण पण विलक्षण आहे. या दुसऱ्या माताजी शिस्तीच्या एकदम कडक. पोरांनी फक्त अभ्यास एके अभ्यास करावा, हि त्यांची इच्छा. अभ्यास केला नाही तर भयंकर शिक्षा केली जात असे. मुलांचे वडील प्रेमळ. पण या कजाग बाईपुढे त्यांचे काही चालत नसे. त्यांनी खटपटी करून आपली बदली करून घेऊन एकटेच लांब जाऊन राहू लागले. इकडे पोरांचं बालकांड चालूच. मुलं मुळातच हुशार असल्याने डॉक्टर-इंजिनिअर झाली. एक मुलगा परदेशात गेला तो तिकडेच स्थाईक झाला आणि आई वडिलांचे सगळे संबंध तोडून टाकले. दुसरा परदेशात शिकून भारतात आला पण एका लांबच्या शहरात जाऊन आपले कर्तृत्व सिद्ध करू लागला. तिथे त्याने नाव काढले. मुलांवर जरा माया केली असती तर पोरांनी आईचं असं नाव टाकलं नसतं. शिस्तसुद्धा मायेने लावायची असते हे तिला कधी कळलंच नाही. 

पण यातून ती काही शिकली तर आई कसली. दोन्ही मुलं लांब गेल्यावर धाकटी मुलगी फक्त राहिली. तिचे पण लग्न करून दिल्यावर आणि स्वतःच्या नवऱ्याचं निधन झाल्यावर ही बाई एकटी पडली. मग तिने तिच्या मुलीवर इतके “प्रेम” दाखवायला सुरुवात केली कि ती घटस्फोट घेऊन माहेरीच कायमची रहायला आली. अर्थातच तिचे पुन्हा लग्न तर झालेच नाही, पण पुढची २५ वर्ष आईची सेवा करत बसावे लागले. यात या “आई”ला काय मिळाले? तिने तिचे भवितव्य सुरक्षित केले पण त्या मुलीच्या आयुष्याचे काय?    

वयाबरोबर समज वाढते असं म्हणतात. पण या बाईंचा फक्त अहंकार वाढला. मुलांचा इतका दुस्वास त्या करू लागल्या कि त्यांचे नाव तर त्यांनी टाकलेच, पण आपल्या मुलीचे दोन विद्वान भाऊ पण हिरावून घेतले. एकदा मात्र फारच आजारी पडल्यावर मुकाट्याने मुलाच्या बंगल्यावर जाऊन राहिल्या. बरं वाटल्यावर परत दुरावा सुरु. आता तो इतका वाढला कि  त्या मुलाचा भारत सरकारतर्फे सर्वोच्च सन्मान झाला तरी त्याच्या कौतुकात ती काही सामील झाली नाही. आपल्या मुलांचे बालपण व आपल्या मुलीचे आयुष्य केवळ आपल्या अहंकारापायी उध्वस्त करण्याचे कार्य या बाईंनी केलं. हिला कोण माता म्हणेल?

आता हि तिसरी आई पहा. नवऱ्याचं व एकुलत्या एका मुलाचं अकाली निधन झाल्यावर तिने नातेवाईकांचा मिळत असलेला आधार न घेता आपली मनमानी सुरु केली. एका मुलीचं एका गरीब मुलाशी लग्न  लावून देऊन दुसऱ्या मुलीचं मात्र काही न काही खुसपट काढून लग्नच होऊ न दिलं. ती गरीब मुलगी आपल्या आईचा सांभाळ करीत राहिली. पुढे आपल्या आईसाठी तिला आपल्या आयुष्याचा आणि आपल्या आकान्क्षांचा कायमचा बळी द्यावा लागला. आपल्या मुलीच्या नोकरीच्या जीवावर ती पुढे ८७ वर्षे चांगली जगली. आईचा कट त्या मुलीच्या लक्षात आला, पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. पण नंतर ती आईला कधीच क्षमा करू शकली नाही. एखादी बाई निराधार होण्याच्या भीतीने अशी वागली असेल, असं समजून घेता येईल. तरीही प्रश्न उरतोच कि, आपल्या मुलीच्या आयुष्याचा बळी देणारी ही अशी कशी आई?

आता चवथे उदाहरण तर फारच भयंकर आहे. या बाईने आपल्याच मुलांमध्ये भांडणं लावली. एकाच्या कागाळ्या दुसऱ्याकडे, दुसऱ्याच्या तिसरीकडे. सरसकट थापा मारणे. सरासर खोटं बोलणे, हे सर्व प्रकार अगदी निर्लज्जपणे चालू ठेवले. मुलगा आणि सुनेबरोबर तर अगदी खालच्या थरावर जावून झोपडपट्टीतल्या लोकांप्रमाणे, कचा कचा भांडणं केली. आता असं अनेक ठिकाणी पहायला मिळते, यात काय विशेष असं वाटेल.

पण एव्ह्ढयावर कुठले भागले. नवऱ्याची परगावी बदली झाल्यावर त्याच्याकडे दुर्लक्ष करून त्या मुलीकडेच ठिय्या देऊन बसल्या. साठीच्या आसपासचा तो गरीब नवरा बिचारा एकटा कुठेतरी लांबच्या खेड्यात जाऊन राहिला. नवरा आजारपणात मेल्यावर तर त्या अगदी मोकाट सुटल्या. पुढे पुढे आपल्या नातेवाइकान्च्या, अगदी मुलीच्या सासरी सुद्धा त्यांनी रोकड रकमेच्या, लहान सहान वस्तूंच्या चोऱ्या करायला सुरुवात केली. आपल्याच मुलांच्या नजरेतून त्या पूर्णपणे उतरून गेल्या. पाताळयंत्री, हेकेखोर आणि स्वार्थापायी कोणत्याही पातळीवर जाऊन दुराचार करणाऱ्या अतिशय बुद्धिमान आणि कवी मनाच्या या स्त्रीने आपल्या या विचित्र स्वभावाने माता या शब्दाला काजळी फासली. 

आता शेवटचे उदाहरण म्हणजे कहरच आहे. या बाई स्त्रीवादी आहेत. आपल्या अस्तित्वाविषयी अतिशय जागरूक आहेत. पुरुषांविषयी एक प्रकारचा द्वेष त्या सतत मनात बाळगून आहेत. इथपर्यंत त्यांना समजून घेता येतं. पण नवऱ्याने घेतलेल्या काही निर्णयामुळे त्या बाईंचा एव्हढा तोल गेला कि त्याचा राग आपल्या मुलांवर त्या काढू लागल्या. मुलीला पुरुषांचा द्वेष करण्याचे बाळकडू पाजू लागल्या. दुसरीकडे, सर्व पुरुषांवरचा राग त्या मुलांवर काढू लागल्या. मुलांना तर शिस्तीच्या नावाखाली इतके धाकात ठेवले कि त्या मुलांचा आत्मविश्वासच नाहीसा झाला. उठ म्हटला कि उठ आणि बस म्हटला कि बस, असे सुरु झालं. ती मुलं शिकली, नोकरी करू लागली तरी आईचा धाक इतका कि आईला विचारल्याशिवाय साधे पेनही खरेदी करू शकत नाहीत.

पण त्यापुढे जाऊन त्या बाई मुलांच्या मनात आपल्या पित्याविषयी त्या विखारी विचार पेरीत राहिल्या. लहान असेपर्यंत त्या मुलांच्या मनात वडिलांविषयी प्रेम वगैरे कधी रुजुच दिले नाही. पण मुले मोठी झाल्यावर कधीतरी मुलांना खरं काय ते शेवटी कळलेच. आणि मग आता त्या बाईंची अवस्था मुले तिरस्कार करताहेत, मुलगी लग्न करायचे नाव काढीत नाही आणि नवऱ्याचं घरात लक्ष नाही  अशी झाली आहे. आपल्याच मुलांच्या नजरेतून उतरण्याचे दुर्भाग्य या बाईंच्या वाट्याला आले. कुणाला अशा स्त्रीविषयी सहानुभूती वाटेल? कोण हिला “प्रेमस्वरूप आई” म्हणेल?

ही अर्थातच फक्त प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. पण मला नेहमी असा प्रश्न पडतो कि या स्त्रियांना आपली नैसर्गिक आईची भूमिका बाजूला ठेवून असा कुलक्षणी विचार का करावासा वाटला?

या सगळ्या स्त्रियांची कौटुंबिक पार्श्वभूमी तशी चांगलीच होती. कुणाचं बालपण फार अवघड,  विचित्र वा विकृत वगैरे असं काहीच नव्हतं. मग हा त्यांच्या स्वभावातला विचित्रपणा आला कुठून? या सगळ्या आयांमध्ये एक कॉमन गोष्ट आहे कि त्या दिसायला सर्व साधारण आहेत, कुणीच फार सुंदर वगैरे प्रकारात मोडत नाहीत. हल्ली प्रत्येकच स्त्रीला आपली स्वतःची ओळख वा स्वतंत्र अस्तित्व असावे वाटत असते. तशी या सर्व जणींना पण हि स्वाभिमानाची जाणीव आहेच. पण त्यामुळे या एकदम टोकाची अनाकलनीय भूमिका घेतील?

नाही पटत हे. मग काय कारण असेल?  

बिरबलाची माकडीण पण आपल्या पिल्लांचा बळी देऊन स्वतःचा जीव वाचविण्याची धडपड करते, हे सर्वांना माहीतच आहे. स्वतःचे अस्तित्व धोक्यात आले कि माकडीण काय, बाई काय पण कोणताही प्राणी असं विचित्र वागू लागतो. शेवटी स्वतःचा जीव वाचविण्याची नैसर्गिक प्रेरणा सगळ्यांमध्ये आहे.
आपले अस्तित्व धोक्यात आहे, असं या बायकांना वाटत असेल, तर त्यांचे वागणे विचित्र होऊ शकेल. पण मुळात या बायकांची लग्न झाली आहेत, एखादा अपवाद सोडला तर नवरा सुस्थितीमध्ये आहे, मुलं सगळी नीट शिकलेली आहेत. मग यांना अशी भीती का वाटावी?

असुरक्षितता ही केवळ मानसिक कल्पना आहे. भीतीपोटी एकदा  “आता माझं कसं होईल?” असा विचार सुरु झाला कि ती भीतीच पुढे स्वसरक्षणाची योजना आखायला लागते.

उदा: बहुतेक स्त्रियांना “माझा नवरा (हल्ली मित्र किंवा सखा/बॉयफ्रेण्ड) मला सोडून गेला तर?” हा विचार भयंकर सतावतो. आणि मग तो सोडून जाऊ नये म्हणून त्याच्यावर ताबा वाढविण्याचा प्रयत्न सुरु होतो. हेच ते पझेसिव होणं. ही असुरक्षितता मग वाढत वाढत जाऊन शेवटी त्याचा राक्षस होतो आणि मन नेमकं उलटा आणि नकारात्मक विचार करायला सुरुवात करतो.
 
एक कॉलेजला जाणारा मुलगा होता. तसा तो हुशार होता. पण मुळातच जरा भित्रा होता. परिक्षा जवळ आली कि त्याची झोप उडायची. तशी सगळ्यांचीच उडते. पण याचं प्रकरण जरा वेगळंच होतं. अभ्यासाच्या ऐवजी कुठे चोरून प्रश्न पत्रिका मिळेल का, कॉपी कशी करता येईल असं सारखं याचं चाललेलं असायचं. त्यामुळे अभ्यास, झोप सोडून देऊन तो असा काही विचित्र वागायचा कि त्याची इतरांना कींव यायची. एरवी सरळ वागणारा मुलगा भीतीने शेवटी चोरासारखा वागतो याचं कारणच ही असुरक्षितता. ती त्याला माकड बनवायची.

या वरच्या पाचही आयांच्या उदाहरणांमध्ये हा एक असुरक्षिततेचा मुद्दा मात्र समान आहे. त्या सर्व स्त्रिया अतिशय बुद्धिमान आहेत. पण एकदा का या असुरक्षिततेने पछाडले कि त्या त्यांच्या बुद्धिमत्तेचा एकदम उलट्या मार्गाने उपयोग करू लागतात. आणि मग त्यांचं होतं माकड. एकदा का बुद्धी चुकीचा विचार करायला लागली कि मग प्रत्येक घटनेचा, प्रत्येक वाक्याचा उलटाच अर्थ काढला जातो. हे मन पण विचित्रच असतं. ते तुम्हाला कधी उंच आकाशात घेऊन जातं किंवा सागराच्या तळाशी पण.

जरा बुद्धी कमी असेल, तार्किकता कमी असेल तर भक्ती, श्रद्धा या मार्गाने त्या मनाला योग्य मार्गाने नेता येतं. पण अश्रद्ध माणसांचे मात्र हालच होतात. केवळ बुद्धीच्या सहाय्याने सतत सकारात्मक विचार करणे, सगळ्यांना जमतेच असं नाही.

या सर्व बायकांनी आपल्या नैसर्गिक प्रेम करण्याच्या प्रवृत्तीच्या विरुद्ध जाऊन आपले स्वतःचे भवितव्य सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला. अर्थात त्यामुळेच त्यांना त्याचं काही चुकलं असं कधीच वाटले नाही. त्यांचा तथाकथित अहंकार हा सुद्धा त्यांचा एक प्रकारे स्वसंरक्षणाचा प्रयत्न असतो. आणि या प्रवृत्तीवर मात करणे फार कठीण असते. बुडत्याची वाचविणाऱ्याला घातलेली मिठी पण अशीच असते. आपण जे करतो आहोत त्यामुळे आपणच धोक्यात येत आहोत हि जाणीवच नसते. त्यात दुसऱ्याची पर्वा नसते. बस, मी वाचलो म्हणजे झालं, अशी भावना असते.

आणि नेमका हाच धोका बऱ्याच लोकांना ओळखता येत नाही. या असुरक्षिततेत अवाजवी महत्वाकांक्षा आणि सत्ता गाजविण्याची भूक जमा झाली कि चांगल्या माणसाचं होतं माकड. आणि मग होते एका चांगल्या मातेची वैरीण.  असं अर्थात मला वाटतं. ते चुकीचाही असू शकेल.

कैकयीने केवळ भरताचे म्हणजे आपल्या पुत्राचे हित पाहिले. यात तसे पाहिले तर काय चूक? जवळ जवळ प्रत्येक मातेच्या मनात हा विचार येतच असतो. पण सद्सद्विवेकबुद्धी बाजूला ठेवून तिने रामाला १४ वर्षे वनवासाला पाठविले यात तिची दुष्ट बुद्धी दिसली आणि ही  आपल्या मुलावर अत्यंत प्रेम करणारी माता इतिहासामध्ये आणि लोकधारेमध्ये खलनायिका होऊन बसली.

वर दिलेल्या प्रत्येक उदाहरणामध्ये या स्त्रियांचे वर्तन तसे सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे अप्पलपोटे आणि स्वकेंद्रित होते. तसे वर्तन आपल्या आजूबाजूला अनेक स्त्री-पुरुषांकडून घडत असते. मग याच स्त्रियांना लक्ष्य का? कारण आपण मातृत्वाला फार वरच्या पदावर नेऊन ठेवले आहे. म्हणून मग यांचं वर्तन खटकते. या “वात्सल्यसिंधू” मातेला सर्व सामान्यपणे जगण्याचा वागण्याचा हक्कच नाकारला जातोय. किंवा अशा “प्रेमस्वरूप” आया कमीच असतात. पण कवींनी त्यांचे फार उदात्तीकरण करून ठेवल्यामुळे उगाच सर्वच स्त्रियांकडून अवास्तव अपेक्षा ठेवल्या जात आहेत.

दुसरं म्हणजे अनेक माता या अशा सर्व सामान्य स्त्रिया असल्या तरी त्यांच्याविषयीच्या निगेटिव भावना त्यांच्या मुलांना व्यक्त करता येत नाही. आणि सर्व समाज हि ते समजून घेऊ शकत नाही. पण हे कोणीतरी बोललं पाहिजे.

अर्थात हे झालं माझं मत. तुमचं मत काय?        








 

Tuesday, October 23, 2012

बायपासचे धड़े !!! भाग 2 My days of Bypass operation


बायपासचे धड़े !!!  भाग 2
(चाल: विंचुर्णीचे धडे)
उद्या काय होणार, या चिंतेने म्हणे बऱ्याच लोकांना ऑपरेशनच्या आदल्या दिवशी झोप येत नाही. मी पण एक झोपेची गोळी तयार ठेवली होती. पण कसचं काय, नाव विश्राम पडले ना! डोळे मिटले कि एकदम सकाळीच जाग. भूक आणि झोप यांचा दुष्काळ तर सोडाच जरा कमतरता सुद्धा कधी आयुष्यात पडली नाही तर आता कशी पडेल? सकाळी सकाळी एक नरसोबा (म्हणजे पुरुष नर्स) व्हील चेअर घेऊन आला, ऑपरेशनला घेऊन जायला. मी म्हटलं, अरे मला नीट चालता येतंय! पण छे. माझं काही एक न ऐकता माझी गाडी गाडी सुरू झाली. जाताना तो ढकल-बॉय सांगत होता कि लोक म्हणे ऑपरेशनला घाबरून पळून जातात, म्हणून ही  खबरदारी. ऑपरेशनला घाबरून डॉक्टर पळून गेल्याचं उदाहरण आहे का, असं विचारणं हेच चूक होतं हे त्या बॉय च्या चेहऱ्याकडे पाहूनच कळलं.

ऑपरेशन थिएटरच्या बाजूच्या रिकव्हरी रूम मध्ये बहुतेक माझीच वाट पहात होते. सगळ्यांनी अगदी घरी येणाऱ्या पाहुण्यासारखे स्वागत केले. तिथे चक्क खरोखरच्याच नर्सेस होत्या. माझी एव्हढी बडदास्त पाहून भरून आले. पण एक दुष्ट विचार मनात आला. (मन चिंती ते.....) यांना खरंच मनापासून आनंद झाला कि एक बकरा मिळाला म्हणून.....!!! छे. छे!! असा विचारसुद्धा आला नाही पाहिजे.  कालचाच भूलारी (म्हणजे अनेस्थेटीस्ट हो....) परत समोर उभा. माझ्याकडे ठेवणीतले व्यापारी स्मित फेकता फेकता मधेच डोक्याकडे पण पहात होता. म्हटलं झालं...आता तो आपलं डोकं पण उघडून बघणार. न्हाव्याच्या दुकानात गेल्यावर कसं तो कधी दाढीकडे तर कधी डोक्याकडे पहात असतो. मी अशावेळी घाईघाईने डोक्याकडे बोट दाखवी. हो, उगाच नसलेली दाढी करून परत पैसे उपटायला मोकळा. या भूलाऱ्याला मला सांगायचं होतं कि बाबा रे, माझी फक्त छातीच फाड. डोक्याला हात लावू नको. ते आता सुधारायच्या पलीकडे गेले आहे.

पण त्याच्या स्मित हास्याकडे बघता बघता मी फक्त छातीवर हात ठेवला. तोंडातून एकही शब्द न फुटल्याने मी  कसेबसे हसलो. त्याला वाटलं असावं कि फारच घाबरलो आहे. “अहो, घाबरू नका, साधे प्लंबिंग आहे हे. एक रक्त वाहिनी काढून तिचे दोन तुकडे करून इथून तिथून जोडायचे, कि झाले ऑपरेशन.” माझ्या डोळ्यासमोर आमच्या घरी नेहमी येणारा प्लंबर उभा राहिला. एकंदर सगळेच प्लंबर पैसे काढण्यात तरबेज असतात. आणि शिवाय त्यांनी प्लंबिंग केलेले नळ-जोड लगेच वर्षभरात गळायला लागतात. म्हणजे आता हृदयाच्या प्लंबिंगचे काही खरं नाही. वर्षभरात परत तिथून रक्त गळायला लागलं तर? माझ्या चेहऱ्यावरचा प्रश्न बघूनच तो भूलारी लगेच म्हणालाच कि अहो, ते बायो-प्लंबिंग असते. म्हणजे कधीच गळत नाही. हुश्श!

मग परत एकदा सगळं ठीक आहे हे बघून त्याने खूण केली आणि लगेच एका नर्सने दंडात मॉरफिन खुपसले. हा हा !! माझ्या त्या दिव्य प्रवासाला सुरुवात झाली. थोड्याच वेळात सिनेमात दाखवतात त्या प्रमाणे सगळं धुसर दिसायला लागलं. मी डोळे मिटले. म्हटलं, आता हे शरीर तुमच्या स्वाधीन करतो आहे. जो कुछ प्लंबिंग करना है, कर डालो. सीन समाप्त.

जरा वेळाने जाग आली तर काय मी परत तिथेच. त्याचं बेडवर. आणि तीच नर्स व तोच नरसोबा समोर. अरेच्चा. ऑपरेशन कॅन्सल झाले कि काय. पण अंगावर एकही कपडा नव्हता (अंगावर चादर होती बरं) आणि छातीवर एक बँडेज होतं. यांव! ऑपरेशन झालेला दिसतंय. पण दुखत कसं नाहीये?

माझी हालचाल बघून एक सुंदर गोरी नर्स जवळ आली. (जरा पस्तीस-एक वर्ष उशिरा आली !! म्हणून धड धड वगैरे काही झाली नाही) “काका (अरे अरे); कसे आहात?”  मी म्हटलं, ‘अगं (पोरी) मला सांग माझा ऑपरेशन झालं कि काही गडबड झाली?’. आता हसण्याची पाळी तिची होती. पुढची पाच मिनिटे तिने सगळं ऑपरेशन काल कसं छान पार पडलं ते सांगितल्यावर माझी विकेटच गेली. म्हणजे कालपासून मी आपला झोपेतच किंवा गुंगीतच. काही म्हणजे काही सुद्धा आठवत नव्हतं. खरं म्हणजे आता “मैं कहां हुं” असं विचारायला हरकत नव्हती.  काही हवं का वगैरे विचारून ती समोरच तिच्या टेबलावर गेली. खरं म्हणजे खायला-प्यायला-हिंडायला बंदी असल्याने या प्रश्नाला तसा काही अर्थ नव्हता. जेंव्हा सगळं काही ठीक-ठाक असतं तेंव्हा असं का कुणी (म्हणजे नर्स वगैरे) विचारत नाही? असो. किती वेळा उसासे सोडणार? 

काल ऑपरेशन झाले, आणि आपल्याला काही म्हणजे काहीसुद्धा कसे आठवत नाही? असंच सगळ्यांचं होत असेल का? पलीकडे एक आजोबा सारखे कण्हत कुंठत होते. चवकशी केली तर कळलं कि त्यांचं पण बायपासचंच ऑपरेशन झालय ! मग मला का बरं काही दुखत नाही? असा विचार येत असतांनाच खोकला येऊ घातला. आणि मग कळलं छातीतलं दुःख काय असते ते. पुढचे दोन दिवस मी जरा तोंड उघडले कि सगळे नर्स-नरसोबा धावत येत आणि मग मला उठून बसव, जरा गप्पा मार असं करू लागले. पण मला मात्र बोलायला बंदी. चला. आयुष्यभर दुसऱ्या कुणाचे ऐकले नाही, स्वतःच सगळी बडबड केली. घ्या आता त्याची परतफेड.

संध्याकाळी मला चार पावलं टाकण्याची ऑर्डर मिळाली. दोन बाजूनी दोन नरसोबा शिवाय मागे पुढे वॉर्डबॉय अशी वरात सगळ्या रिकव्हरी वॉर्डभर फिरली. शिवाय जेवायला फुल थाळी आली. सलाईनही काढून टाकलं. मग वर्षां, विश्वासदादा, आणि कोणी कोणी भेटायला आले. मी जरा तोंड उघडताच लगेच मला गप्प बसण्याचा दम मिळाला. विश्वासदादाने तर त्या नर्सलाच सांगून टाकले, कि ‘याला बोलू देऊ नका. हा फार बडबड करतो’. याला म्हणतात तोंड दाबून बुक्क्यांचा मार.  पण काय करतो. मी असा त्यांच्या तावडीत पुन्हा पुन्हा थोडाच सापडणार होतो. करून घ्या चैन. एकदा बाहेर आलो कि बघतो.  म्हणजे हवं तेव्हढं बोलतो.

पण तिथली एक सय्यद नावाची नर्स (तीच ती, सुंदर गोरी) मात्र जणू माझ्या तैनातीलाच होती. तिची ड्युटी असेपर्यंत तिने माझी एव्हढी काळजी घेतली कि जणू एक मुलगी आपल्या पित्याचीच सेवा करीत आहे. मला अगदी बरं वाटतं आहे, पण वेळ जात नाही असं जाणवून खास वेळ काढून माझ्याशी गप्पा मारायला आली. मला पाणी पाजण्याची हिम्मत आयुष्यात प्रथमच कुणी केली असेल तर तिने. तिची ड्युटी संपल्यावर मात्र ती निर्लेपपणे निरोपही न घेता गेली. एव्हढ्या प्रेमळपणे आपलं कर्तव्य फक्त केरळीच करू शकतात हा माझा समज मात्र तिने खोटा ठरवला. परत कधी भेटेल ती? आता तेव्हढ्यासाठी परत बायपास म्हणजे फारच अवघड आणि महाग. नाही? पण दुसऱ्या दिवशी भेटेलच कि ती, अशी मी समजूत करून घेतली.  

दुसऱ्याच दिवशी ती कामावर यायच्या आधीच आमची रूममध्ये रवानगी झाली. पण या प्रेमळ आणि निरलसपणे काम करणाऱ्या कन्येला कसा विसरू?  
पुढे वाचत रहा........


      
      

Tuesday, October 16, 2012

My days of bypass operation


बायपासचे धड़े !!!
(चाल: विंचुर्णीचे धडे)
तुम्ही रस्त्याच्या कडेकडेने फुटपाथवरून नीट सरळ चालला आहात. आपल्याच नादात! रस्त्यावरची  रहदारी आपल्या गतीने चालली आहे. आणि एकदम एक गाडी आपला रस्ता सोडून सरळ तुम्हाला धडक देते. तुम्ही फेकले जाता. हात-पाय तुटतात. आणि तुम्ही रागाने आणि आश्चर्याने त्या गाडीकडे पाहता. हा कसा गाडी चालवतो गाढवासारखी. पण तुम्ही बाकी काही करू शकत नाही. कारण ती असते नियती. 

मीच कसा  सापडलो नियतीला?  

माझा एन्जिग्राफ़ीचा रिपोर्ट वाचतांना माझ्या इतकेच माझ्या फिजिशिअनलाही आश्चर्य वाटत होते. दररोज एक तास जिममध्ये घाम गाळणाऱ्या माणसाच्या हृदयातल्या रक्त वाहिन्या एवढ्या अरुंद झाल्याचे त्यांच्याही पाहण्यात नसावे. पण सत्य समोर वाकुल्या दाखवीत  उभे होते. बायपास शिवाय दुसरा कसलाच उपाय नाही असं सांगणं त्यांनाही जड जात होतं. ८०-८५च्या वयात करण्यापेक्षा साठीत बायपास करणं चांगलं असतं एव्हढाच काय तो दिलासा ते देऊ बघत होते.

म्हटलं चला, हाहि एक अनुभव गाठीला ! आतापर्यंत फक्त इतरांनाच हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले बघत आलो. आता आपणही बघू या कसं वाटतं, हॉस्पिटलच्या बेडवर झोपून. पण आपण आजारी आहोत हे खरं म्हणजे पटतच नव्हतं. कसं मस्तपैकी खाणं-पिणं-झोपणं (याला जीवन ऐसे नाव! J) चाललं होतं. ‘गुड-लक’च्या खिमा-पाव-चिकनची आणि बेडेकरांच्या मिसळीची आठवण येत होती. नाही म्हणायला फिरायला गेल्यावर किंवा जिम मध्ये गेल्यावर बरोबर १० मिनिटांनी थोडा दम लागायचा. पण त्याकडे दुर्लक्ष  केल्यावर पुढचे ३०-४० मिनिटे मस्त भरभर चालता येत होतं. उलट मस्त वाटायचे. पण आपले शरीर आपल्यापेक्षा यंत्रांना खरं काय ते सांगत असावे.

मोहनरावांचा (तेच ते संध्याचेहे’ ) एक भारी सिद्धांत आहे. त्याचं म्हणणं, कि डॉक्टरांनी तुम्हाला दुसऱ्याचाच एन्जिओग्राफीचा रिपोर्ट दाखवून गंडवलं आहे. २-३ लाखांसाठी आजकालचे डॉक्टर्स काहीही करतील. कुणाचाही अगदी माझाही विश्वास बसेल अशीच ही गोष्ट आहे. पण दुर्दैवाने माझी  एन्जिओग्राफी चालू असतांना डॉक्टरांनी मला ती पडद्यावर समोरच दाखवली असल्याने मी हा सिद्धांत  स्वीकारू शकत नव्हतो. पण त्यात एक गम्मतही होती. माझ्यापेक्षा इतर सर्वांनाच मला हृदयाचा काही  गंभीर रोग झाला आहे, हे पटत नव्हतं किंवा विश्वास बसत नव्हता. मला बरं वाटावं म्हणूनही कदाचित अशा शंका काढल्या जात असतील. { चला, मला बरं वाटावं असं लोकांना वाटतं हेही काही कमी नाही.}

आता एकदा “कार्य” करायचं ठरल्यावर भटजी पण शोधणे  प्राप्त  झालं.   {आमच्याकडे झालेच “कार्य” तर एव्हढेच होऊ शकते, असा विश्वास सर्व आप्त-मित्रांना  आहे.}   दोन-तीन नावांचा शोध घेतल्यावर सर्वानुमते एका नावावर एकमत झाले.  डॉ. जगताप  यांचा बायपास करण्यात हातखंडा आहे असं कळलं. {माझ्या डोळ्यासमोर धडाधड जिलबी पडणारा आचारीच उभा राहिला.  आला पेशंट, कर बायपास. आला पेशंट, कर बायपास. आणि मग शेवटी कपाळावरून घाम झटकून  हात पंचाला पुसून, घरी  जाणारा डॉक्टर (आपलं... आचारी) कसा दिसत असेल? }  नंतर कळलं कि ते खरंच दिवसाला ९-९ बायपास पाडतात, म्हणजे करतात.  

मग आता एव्हढ्या बिझी माणसाला गाठणार कसे आणि त्याच्याकडे महिनाभर वेळच नसला तर काय असे प्रश्न पडू लागले. आणि मग एकदम संध्याला (तीच ती  मोहनरावांची ही')  आठवलं कि डॉ. सुहास हरदास घोलपांच्या घरचेच आहेत. ते नक्की मदत करतील. लगेच डॉ. भरत घोलप (त्यांना दहा पोरं  होऊ दे!) यांना मध्ये घालून आम्ही डॉ. हरदासांच्या दरबारात हजर. त्या मस्त माणसाने (त्यांना पण दहा पोरं होऊ दे!) आमचा प्रश्न अक्षरशः एका मिनीटात सोडवला. धडाधड फोनवर बायपासची तारीख, भटजी (म्ह. डॉ. जगताप), मंगल कार्यालय (म्ह. सहयाद्री हॉस्पिटल), मुहूर्त वगैरे सगळं ठरवून वर अजून काय पाहिजे असं विचारलं.  आम्ही पार गार!!! डॉ. भरत घोलपांची काय वट आहे, एव्हढाच विचार सारखा येत होता. शिवाय पैसे पण घेतले नाही, म्हणजे केव्हढी वट बघा.

सह्याद्री हॉस्पिटल विषयी एका सर्जनने फार चांगले मत दिले नाही, म्हणून मग बाकीच्या हॉस्पिटलचा पण शोध सुरु झाला. आपला विश्वास दादा सह्याद्रीमध्ये वर्षभर उपचार घेत होता  म्हणून त्यालाच विचारलं तर त्याने एकदम चांगले मत दिलंच, शिवाय सह्याद्रीचा अगदी आग्रह धरला. खरं म्हणजे माझ्याच दोन्ही डोळ्यांची मोतीबिंदूची  ऑपरेशन सह्याद्री मधेच झाली होती आणि माझं हॉस्पिटल विषयी चांगलंच मत झालं होतं. त्यांची ओपीडी म्हणजे मच्छी बाजार वाटतो. पण एकदा का तुम्ही हॉस्पिटलमध्ये दाखल झाला कि तुम्ही व्हीआयपी बनता. तिथल्या नर्सेस (बहुसंख्य नर्सेस चांगले बापडे म्हणजे ब्रदर्स आहेत, गैरसमज नसावा) तर अगदी प्रेमळपणे वागविणारे/ऱ्या होते/त्या. त्यांचे अगत्य पण अगदी पंचतारांकित होते; अगदी घरी जातांना थोडे वाईट वाटावे इतके. 

पण बायपास म्हणजे वेगळीच गोष्ट आहे, नाही का

हॉस्पिटलमध्ये सहज फोन केला तर कळलं कि तिथे रोज दोन दोन बायपास होतात. म्हणजे महिन्याला जवळ जवळ ५०! वा! म्हणजे माझ्यासारखे शेकडो लोक आहेत तर. मग काय झालंच तर. आणि एव्हढी ऑपरेशन्स तिथे होतात म्हणजे आपल्यावर प्रयोग-बियोग काही होणार नाही. सगळ्यांचे हात (किंवा डोके) तय्यार झाले असतील. ऑपरेशन डोळे झाकून करत नसले म्हणजे मिळवलं.  

शेवटी एकदाच्या सर्व शंका संपल्या. पैशाचा विचार झाला. इंडस  कार्ड  असल्याने तशी फार चिंता नव्हतीच. पण नीट चौकशी आधीच केली असलेली बरंच नाही का? सगळं काही नीट जमून येत आल्यावर आता फक्त हॉस्पिटल मध्ये दाखल होण्याचीच वाट होती. लागलीच नेहमीच्या धान्दलीने फेसबुक वर सगळं टाकायचा विचार होता. पण मग विचार केला कि आत्ताच कशाला टाका? जगलो वाचलो तर टाकू. उगीच कशाला आत्ताच कष्ट करा. (काय हा आळशीपणा !)

हॉस्पिटलमध्ये एकदाचा दाखल होण्याचा दिवस आला. सकाळी ९ वा. आधी सांगितल्याप्रमाणे पोचलो तर काय? कार्डीयोलॉजी विभागात येणारा मीच पहिला होतो. बहुतेक मलाच उत्साह फार असावा. किंवा सगळ्यांना मी येण्याची बातमी कळल्यामुळे सगळेच हॉस्पिटलमध्ये येण्यास कां-कु करत असावेत. कोणाला ही बला हवी असेल? पण तेव्हढ्यात एक डोक्यावर सगळीकडे दुपट्टा गुंडाळून एक तरुणी (बहुतेक तरुणीच) विभागात घुसली. त्या दहशतवादी कपड्यांच्या मागे चक्क एक डॉक्टर होती. माझी जुजबी चौकशी करून माझ्या हातात एक लांबलचक यादी ठेवली, आणि मला कटवलं. मी आपला वाट पहात होतो कि एक छान दिसणारी नर्स येईल, गोड गोड हसत मला माझ्या रूम कडे घेऊन जाईल! (बस! तेव्हढंच! शॉट कट!!) कसचं काय नी कसचं काय.    

आम्ही आपले ती यादी घेऊन मुकाटपणे (अगदी बें बें सुद्धा न करता) पॅथोलॉजी विभागात शिरलो आणि आपले सर्व अवयव त्या त्या मशीनच्या ताब्यात देऊ लागलो. हृदय पहिले, ते ठीक सापडले. (सापडले हे नशिबच, असं कोण म्हणालं?) ठीक म्हणजे ऑपरेशनच्या वेळी दगा देणार नाही, असे. मग बाकीचे सगळे अवयव तपासून घेतले, पण ते सगळेच अवयव ठीकच होते. फुफ्फुसं तपासणारी बाई (बाई कसली, १९-२० वर्षाची बेबीच होती)  तर अगदी निराशेने म्हणाली कि “याच्यात पण काही सापडले नाही, जा तुम्ही आता.” म्हणजे याचा अर्थ काय? काही सापडले तर यांना आनंद झाला असता कि काय? काय पण लोकांच्या अपेक्षा असतात कळत नाही.    

दिवसभर चालणाऱ्या या रहाटगाडग्यात एक मात्र चांगली गोष्ट होती. भूक बिक लागली कि जवळच बिपिनचं मस्त मस्त बटाटेवडे, इडली, उपमा इ.चेदुकान होतं. आता त्यामुळेच मला सारखी भूक लागत होती, असा आरोप माझ्यावर झाला, पण मी तो मनावर व पोटावर घेतला नाही. शेवटी बिपिनला पण पोट आहे, त्याला पण बायका-पोरं आहेत, (सॉरी, एकच बायको), त्याचा विचार आपण नाही करायचा तर कोणी करायचा? बिपिनच्या शेजारी अजूनही दुकानं होती. पण आपली निष्ठा फक्त बिपिनशीच.

सगळीकडचे रिपोर्ट घेऊन परत त्या दहशतवादी बुरख्याकडे गेलो. आता तरी ती नर्स येईल आणि....पण झालं उलटच. “तुमची रूम अजून रिकामी झाली नसल्याने तुम्ही तात्पुरत्या वॉर्डात जा” असा हुकुम पदरात पडला. मला हॉटेलमध्ये आलो आहोत कि काय असं वाटायला लागलं. पण काय करतो आता? मुकाटपणे त्या तात्पुरत्या वॉर्डात जाऊन पडलो. इथे जास्त करून डोळ्यांच्या ऑपरेशनचे पेशंट होते. म्हणजे ते सकाळी येतात आणि दुपारी किवा संध्याकाळी घरी जातात. काय काय तऱ्हेचे लोक होते तिथे. त्यांची मजा बघत बघत वेळ आपला चांगला चालला होता.

शिवाय माझं मनोरंजन करायला विश्वासदादा, संध्या, वैशाली अशा अनेकांची रांग लागली. मला रूम लवकर मिळावी अशी प्रार्थना माझ्यापेक्षा त्यांनीच जोरात करायला सुरुवात केली. मधेच एक डॉक्टर-बाई माझा धीर वाढवण्यासाठी आली. माझं खिदळणं बघून “अहो हे बायपास ऑपरेशन आहे, जरा सिरीयसली घ्या” असं बिचारीला सांगावं लागलं. एक भूल तज्ञ येऊन माझं बौद्धिक घेऊन गेले. सगळं ऑपरेशन कसं होणार याची कल्पना देण्याचा आटोकाट प्रयत्न त्यांनी केला. माझ्या मात्र ऑपरेशनच्या आधी मला मॉरफिनचं इंजेक्शन देणार असल्याचं तेव्हढं लक्षात राहिलं. बस. ये बात हुई न! एकदा गुंगी द्या आणि मग खुशाल हवी ती चिरफाड करा.

आता संपूर्ण छाती फाडून हृदयाची रक्तवाहिनी बदलायचं ऑपरेशन म्हणजे तसं अवघडच. त्याचं वर्णन ऐकून तिथे हजर असलेल्यांचीच धडकी भरली. पण एकाने एक मुद्दा काढला कि हनुमानाने आपली छाती फाडली तेव्हा तिथे राम भगवान दिसले होते (म्हणतात). पण आता माझ्या छातीमध्ये कोण दिसणार? भर्रकन लहानपणापासून ह्रदयात साठून ठेवलेल्या अनेक छब्या आठवल्या आणि छातीत धस्स झालं. मी हळूच त्या डॉक्टरांना बाजूला घेऊन सांगितलं कि प्लीज माझी सगळी रहस्य माझ्या पोटातच (म्हणजे हृदयातच) ठेवा. बायकोला तर अजिबात सांगू नका. उगाच उरल्या-सुरल्या संसारात मिठाचा खडा नको. ते डॉक्टर माझ्या डोक्याकडे गंभीर चेहेऱ्याने पाहू लागले. बहुतेक याचं डोक्याचं पण ऑपरेशन करावं लागेल असा त्यांच्या चेहऱ्यावर भाव होता.

मग एकदाची स्वारीची रवानगी रूममध्ये झाली. मध्ये पडदा घालून दोन पेशंटची एकाच रूम मध्ये सोय केलेल्या त्या रुममध्ये पलीकडे एक पेशंट डिस्चार्जची वाट पहात होता. फोनवर त्या पेशंटची सगळी कहाणी अनेकांना त्याच्या बायकोने अनेकदा सांगितल्यामुळे आम्हाला पण ती तोंडपाठ झाली. अश्या किमान तीन पेशंटच्या कहाण्या पुढे पाठ होणार होत्या. शेवटी एकदाचा तो पेशंट आनंदाने (आमच्यापण) गेल्याने सगळी रूम आमच्या बापाची असल्याचा भास होऊ लागला. पण एकदा रूम ओस पडल्याने एकदम जाणवलं कि आता आपले उद्या ऑपरेशन. ते पण बायपासचे. सगळ्या सर्जरीमध्ये असलेली एकदम बाप सर्जरी. याला म्हणतात नशीब. आयुष्यात कधी ओरखडा सुद्धा न उठलेल्या शरीरावर एकदम बायपास. माझी एक बहिण नेहमी म्हणायची कि विश्रामचं म्हणजे सगळं उलटंच असतं. सब सोनारकी आणि एक लोहारकी. वा! ऑपरेशन असावं तर असं.  छाती कशी भरून आली. आता उद्या काय होणार? उद्याचं उद्या.